Saturday 23 June 2018

जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत लागू झालेली राज्यपाल राजवट..

सध्याचे राज्यपाल :- एन. एन. वोहरा.

राज्यपालांचे सल्लागार :- निवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय कुमार आणि बी. बी. व्यास.

  • भारतीय जनता पक्षाने नुकतेच  जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 
  • यामुळे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू कराण्यात आली. 
  • यापूर्वीही अनेकवेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. 
  • आतापर्यंत एकूण 7 वेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

मार्च 1977 

  • पहिल्यांदा येथे मार्च 1977 मध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. 
त्यावेळी नॅशनल कॉन्फ्रंसचे नेते शेख अब्दुल्ला यांनी कांग्रेससोबतची आघाडी तोडली होती, त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. 
  • कार्यकाळ - 105 दिवस.

मार्च 1986 

  • दूसऱ्या वेळी 1986 साली राज्यपाल राजवट लागू झाली. यावेळी सरकारने विधानसभेत बहुमत गमावले होते. 
  • कार्यकाळ :- 246 दिवस.

जानेवारी 1990

  • संविधानिक अडचणीमुळे विधानसभा भंग करण्यात आली होती. हा कार्यकाळ खुप मोठा होता. 
  • कार्यकाळ :- 6 वर्षे 264 दिवस.

ऑक्टोबर 2002

  • कार्यकाळ :- 15 दिवस.

जुलै 2008 

  • कार्यकाळ :- 178 दिवस. 
  • कांग्रेस आणि पीडीपी मधील युती तुटल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. 
  • यावेळी कांग्रेसचे गुलाम नबी आजाद मुख्यमंत्री होते. 

जानेवारी 2015 

  • निवडणुकांच्या निकालानंतर कोणीच सरकार स्थापन न करु शकल्याने यावेळी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. 
  • कार्यकाळ :- 51 दिवस.

जानेवारी 2016 

  • तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृ्त्यूमुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. 
  • कार्यकाळ :- 87 दिवस.

अधिक माहितीसाठी आमची WEBSITE :- www.reliableacademy.com 

Friday 13 April 2018

आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

जन्म :- इ.स. १४ एप्रिल १८९१. महू - इंदूर जिल्हा - मध्य प्रदेश.


मृत्यू :- ६ डिसेंबर १९५६ (वय ६५) दिल्ली.

टोपणनाव :- बाबासाहेब, बोधिसत्त्व, भीमा, भिवा, भीम. 
मूळ गाव :- रत्‍नागिरी जिल्हात मंडणगडाजवळ असलेले आंबडवे. 
वडील :- रामजी सकपाळ (लष्करात सुभेदार मेजर होते). 
आई :- भीमाबाई रामजी सकपाळ. 

शिक्षण :- 

मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेज इन्, लंडन
बॉन विद्यापीठ, जर्मनी.

पदव्या :- 

बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. (एकूण ३२ पदव्या).
परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळवणारे पहिले भारतीय.
दक्षिण आशियातून दोन वेळा डॉक्टरेट (पीएचडी व डी.एससी.) मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होय.

पुरस्कार :- 

भारतरत्न (१९९०),
पहिले कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम (२००४),
द ग्रेटेस्ट इंडियन (२०१२).

संघटना :-

  • बहिष्कृत हितकारिणी सभा. 
  • समता सैनिक दल. 
  • स्वतंत्र मजूर पक्ष. 
  • डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी. 
  • शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन. 
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटी. 
  • द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट. 
  • भारतीय बौद्ध महासभा. 
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.
भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री :- कार्यकाळ - १५ ऑगस्ट १९४७ - सप्टेंबर १९५०.


भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष :- कार्यकाळ - २९ ऑगस्ट १९४७ - २४ जानेवारी १९५०.


  • डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध असलेले जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, बौद्ध धर्म पुनरुत्थानक आणि स्वातंत्र भारताचे जनक होय. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.
  • तरुण आंबेडकरांनी आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालिल सिद्धान्त मांडले.-
वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.

  • ४ जानेवारी १९२८ च्या टाईम्स ऑफ इंडियात इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणार्‍या वाईट वागणुकीबद्दल वृत्तान्त आला होता. त्याची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील  स्थितीशी केली.- 
आपल्या सावलीमुळे हिंदू भ्रष्ट होऊ नयेत म्हणून पेशवाईत अस्पृश्याला सार्वजनिक रस्ते वापरण्याची बंदी होती. अस्पृश्याने चुकूनही आपला विटाळ होऊ नये म्हणून गळ्यात किंवा हाताला काळा दोरा बांधावा असा दंडक होता. त्यामुळे त्याची अस्पृश्य म्हणून ओळख पटत असे. पुणे ही पेशव्यांची राजधानी. पुण्यात ज्या जमिनीवर अस्पृश्य चालेल ती जमीनसुद्धा शुद्ध व्हावी यासाठी अस्पृश्यांना कमरेत एक केरसुणी झाडू लटकवावी लागत असे. असेच अस्पृश्यांची थुंकी रस्त्यात पडली आणि त्यावर चुकून एखादा सवर्ण हिंदूचा पाय पडला तर, तो अपवित्र होऊ नये म्हणून थुंकी गोळा करण्यासाठी अस्पृश्याला गळ्यात एक मडके लटकवावे लागत असे.


अस्पृश्यतेचा विरोध

महाडचा सत्याग्रह

  • इ.स. १९२६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. 
  • इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. 
  • बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. 
  • २० मार्च १९२७ रोजी परिषदेत  आपला मोर्चा चवदार तळ्याकडे वळवला. बाबासाहेब सर्वप्रथम तळ्यातील पाणी ओंजळीने प्यायले, त्यानंतर आंबेडकरानुयायांनी त्यांचे अनुसरण केले. 

काळाराम मंदिर सत्याग्रह

  • काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च इ.स. १९३१ रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये  प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. 
  • २ मार्च १९३० ला बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला, अन तिकडे १२ मार्च १९३० ला महात्मा गांधी यानी दांडीयात्रा सुरू केली. गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजिक होता.

पुणे करार

  • पुणे करार हा २४ सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन प्रमुख भारतीय राजकीय नेत्यांमध्ये झाला. 
  • दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. 
  • त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, सी.राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार पुणे करार या नावाने ओळखला जातो.

बहिष्कृत हितकारिणी सभा

  • बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली. 
  • सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. 
  • अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेऊन, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. 
  • आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. 
  • तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली होती. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा,वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.

कृषी व शेतकऱ्यांसाठी कार्य

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. 
  • हा संप इ.स. १९२८-१९३४ या दरम्यान रायगड जिल्ह्यातल्या 'चरी' या गावात झाला. हा संप तब्बल सात वर्ष चालला. 
  • १४ एप्रिल १९२९ रोजी रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. या शेतकरी परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी कोकणातील  खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन उभारले. 
  • १७ सप्टेंबर  १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले होते 
  • १० जानेवारी १९३८ रोजी २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. 
  • शेतकऱ्यांच्या यशस्वी मोर्च्यानंतर, शेतकऱ्यांची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने; त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. 
  • शेतकऱ्यांच्या अनेक सभांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विशेष म्हणजे हे शेतकरी कुणबी, मराठा आणि मुसलमान होते. 
  • बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या जातींचा विचार न करता सर्व जातिधर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली होती.

गोलमेज परिषद

  • गोलमेज परिषद ही अनेक पक्षांमध्ये चर्चा करण्यासाठीचा मंच होय. 
  • पूर्वी गोल आकाराच्या मेजाभोवती बसून पक्षकार वाटाघाटी करीत असल्यामुळे यास असे नाव आहे. यात कोणालाही मेजाच्या मध्यात किंवा कोपऱ्यात बसल्याने आपले महत्व कमीअधिक आहे असे वाटू नये यासाठी गोल आकाराचे मेज वापरले जायचे. 
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सायमन कमिशन वर चर्चा करण्यासाठी लंडन येथे तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या. 
  • पहिली गोलमेज परिषद - १२ नोव्हेंबर १९३०. 
  • दुसरी गोलमेज परिषद - ७ सप्टेंबर १९३१. 
  • तिसरी गोलमेज परिषद - १७ नोव्हेंबर १९३२. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र पीडित, शोषित व दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या तिन्हींही गोलमेज परिषदांचा हजर राहिले.

 हिंदू कोड बिल

  • हा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ संसदेत मांडला गेला. 
  • स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकरांनी यात भारतातीस सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. 
  • आंबेडकरांनी ४ वर्षे, १ महिना आणि २६ दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. 
  • हे बिल इ.स. १९४७ पासून ते फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले. 
  • हा मसुदा सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहत होता. 
  • हे सात घटक खालीलप्रमाणे :- 
- जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत. 
- मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार. 
- पोटगी. 
- विवाह. 
- घटस्फोट. 
- दत्तकविधान. 
- अज्ञानत्व व पालकत्व.

भारतीय संविधानाची निर्मिती

  • भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्वप्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. 
  • संविधान सभेत सुरुवातीला २९६ सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या २९९ झाली. 
  • ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. ११ डिसेंबरला डॉ.राजेंद्रप्रसाद यांची घटनासमितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. 
  • घटना समितीने घटना निर्मितीच्या कामांसाठी ८ मुख्य समित्या व १३ उपसमित्यांची रचना केली. २९९ सदस्यांना वेगवेगळ्या समित्यांमध्ये कामे वाटुन देण्यात आली. 
  • घटना समितीने राज्यघटना तयार करणे, देशासाठी कायदे तयार करणे, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देणे, भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्विकृत करणे, पहिल्या राष्ट्रपतींची निवड करणे आणि निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणुन कार्यभार पाहणे ही कामे केली. 
  • मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. त्यामध्ये ७ सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करुन घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले. 
  • त्यांनी घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये सादर केला. 
  • भारतीय जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी ८ महिने वेळ दिला. 
  • जनतेची मते, सुचना, टीका विचारात घेऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये दुसरा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन नोव्हेंबर १९४८ मध्ये तिसरा अंतीम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला. 
  • त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकुण तीनदा वाचन झाले. 
  • या टप्प्यात एकुण ७५६३ सुधारणा सुचविल्या गेल्या, त्यापैकी २४७३ सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडुन आली. 
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला. मसुदा बनविण्याचे प्रमुख (Chief Draftsman) म्हणुन एस.एन.मुखर्जी यांनी काम पाहिले. 
  • २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. 
  • २९९ पैकी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी राज्यघटनेवर सह्या केल्या. 
  • घटनेचा अंमल २६ नोव्हेंबर १९५० पासुन सुरु झाला. हा दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे काँग्रेसच्या १९२९ च्या लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा “पुर्ण स्वराज्य दिन” म्हणुन साजरा करण्यात आला होता. 
  • २६ जानेवारी १९५० हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणुन ओळखला जातो. तो दिवस प्रजासत्ताक/गणराज्य दिन म्हणुन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० पासुन घटना समिती संपुष्टात आली. 
  • भारतीय संविधान अंमलात आल्यापासुन भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७, भारत सरकार कायदा १९३५ व त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करण्यात आले. 
  • भारताची घटना निर्माण करण्यासाठी घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास ६० देशांच्या घटनांचा विचार केला. 
  • घटननिर्मितीसाठी २ वर्षे,११ महिने व १८ दिवसांचा कालावधी लागला. (अमेरिकेची घटना चार महिन्यात तयार झाली होती.) 
  • या कालावधीत घटना समितीने ११ सत्रात १६६ दिवस काम केले. मसुदा समितीने १४१ दिवस काम केले. 
  • घटनानिर्मितीसाठी एकुण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये खर्च आला. 
  • भारतीय राज्यघटनेचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी लिहले. त्याच्या प्रत्येक पानावर चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे. 
  • प्रास्ताविकाचे नक्षीकाम बिओहर राममनोहर सिन्हा यांनी केले. हिंदी मुळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहले. त्याला नंदलाल बोस यांनी आकर्षक असे नक्षीकाम केले. 
  • भारतीय संविधानाची इंग्रजी व हिंदी मुळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. 
  • भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत देहारादुन येथे छापण्यात आली. 
  • घटना समितीची निशाणी म्हणुन हत्ती स्विकृत करण्यात आला होता. 
  • मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २२ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत. 
  • प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. भारतरत्न, पद्मभुषण, किर्तीचक्र पुरस्कार प्रजासत्ताकदिनी दिले जातात. 
  • प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये “Abide with me” हे गीत गायले जाते.


FOR MORE INFORMATION VISIT OUR WEBSITE :- www.reliableacademy.com

Monday 12 March 2018

रामसर करार



  • दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला म्हणजेच रामसर करार होय.
  • इराणमधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ मध्ये हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला आणि १९७५ पासून हा अमलात आला. 
  • या ठरावात १९८२ तसेच १९८७ साली सुधारणा करण्यात आल्या आहेत. 
  • संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपैकी सुमारे ९०% देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारताने सुद्धा हा करार स्वीकारला आहे.

उद्देश

स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.

पाणथळ जागा म्हणजे काय..?

  • पाणथळ जागा अतिशय वैविध्यपूर्ण आणि उत्पादक परिसंस्था असतात. त्यांच्यामुळे आपल्याला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. 
  • पण पाणथळ जागांचा दर्जा सातत्याने घसरत आहे आणि त्यांचा वापर इतर कारणांसाठी केला जात आहे. 
  • या ठरावामध्ये पाणथळ जागांची विस्तृत व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाणथळ जागांमध्ये सर्व तलाव, नद्या, दलदली, दलदलीतील गवताळ प्रदेश, खारफुटी वने, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रवाळ बेटे इ.चा तसेच मत्स्य संवर्धनासाठीची तळी, भात शेती, पाणी साठे आणि मिठागरे या मानवनिर्मित ठिकाणांचा सुद्धा समावेश होतो.

रामसर करारातील देशांसाठी पुढील गोष्टी करणे अपेक्षित आहे.


  1. आपल्या देशातील पाणथळ जागांचा विवेकी वापर.
  2. आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या यादीत म्हणजेच रामसर स्थळांमध्ये आपल्या देशातील योग्य स्थळांचा समावेश करणे.
  3. दोन देशातील सामायिक पाणथळ जागा, पाणथळ परिसंस्था आणि प्रजाती यांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करणे.

भारतातील रामसर स्थळे

१ फेब्रुवारी १९८२ मध्ये भारताने या ठरावावर कार्यवाही केली.

भारतातील पुढील पाणथळ जागांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत आहे :--

  • जम्मू आणि काश्मिर :- होकेरा. 
  • त्रिपुरा :- रुद्रसागर तलाव. 
  • राजस्थान :- सांभार तलाव. 
  • मणिपूर :- लोकटक तलाव. 
  • पंजाब :- हरीके तलाव. 
  • जम्मू आणि काश्मिर :- वूलर सरोवर, सुरीन्सर, मानसर तलाव. 
  • ओरिसा :- चिल्का सरोवर. 
  • आसाम :- दीपोर बील. 
  • राजस्थान :- केवलदेव राष्ट्रीय उद्यान. 
  • पंजाब :- रोपर,  कंजली. 
  • केरळ :- वेंबनाद कोल, सास्थमकोट्टा, अष्टमुडी. 
  • हिमाचल प्रदेश :- पोंग डॅम तलाव, चंद्रताल, रेणुका अभयारण्य. 
  • ओरिसा :- भितरकनिका राष्ट्रीय उद्यान. 
  • तामिळनाडू :- पॉइंट कॅलीमेर वन्य जीव आणि पक्षी अभयारण्य. 
  • आंध्र प्रदेश :- कोल्लेरू तलाव. 
  • पश्चिम बंगाल :- पूर्व कलकत्ता पाणथळ जागा. 
  • मध्य प्रदेश :- भोज पाणथळ जागा. 
  • गुजरात :- नलसरोवर पक्षी अभयारण्य. 
  • उत्तर प्रदेश :- गंगा नदीचा वरचा भाग: ब्रिजघाट ते नरोरा.

  • भारतात २६ रामसर पाणवठे आहेत. मात्र, कराराला ४६ वर्षे होऊनही महाराष्ट्रातील एकाही पाणवठ्याला दर्जा मिळालेला नाही.

राज्यातील संभाव्य रामसर जागा :-

  • २००८ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा प्रकाशित ‘पोटेंशिअल अँड एक्झििस्टग रामसर साइट्स इन इंडिया’ या ग्रंथात जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. औरंगाबाद), वेंगुर्ला रॉक्स (बन्र्ट आयलंड), माहूल शिवडीची खाडी (मुंबई), नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (जि. नाशिक), ठाण्याची खाडी (ठाणे-मुंबई) या पाणथळ जागांचा समावेश होता, पण त्यानंतर पक्षिमित्रांची संख्या वाढली व अनेक पाणथळींवर आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. 
  • आता पुन्हा एकदा आपण रामसर निकषांचा विचार केला तर उजनीचे धरण (भिगवण) (जि. पुणे-सोलापूर), हतनूर धरण (जि. जळगाव), नवेगावबांध (जि. गोंदिया), लोणार सरोवर (जि. बुलडाणा) या स्थळांचासुद्धा संभाव्य स्थळांच्या यादीत समावेश होतो. 
  • विशेष म्हणजे लोणार सोडून इतर सर्व जागा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व बर्डलाइफ इंटरनॅशनलद्वारा महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्रे (इम्पर्ॉटट बर्ड एरिया) म्हणून घोषित केलेल्या आहेत.

अधिक माहितीसाठी :- www.reliableacademy.com

Sunday 4 March 2018

रशियन क्रांती - इ.स. १९१७

स्थान :- रशिया.

परिणती :-

  1. दुसरा निकोलाय ची सत्ता संपुष्टात.
  2. रशियन साम्राज्य लयाला गेले.
  3. बोल्शेव्हिकांच्या हातात सत्ता गेली.
  4. रशियन यादवी युद्ध सुरू झाले.

युद्धमान पक्ष :-


  1. रशियन साम्राज्य.
  2. रशियन हंगामी सरकार.
  3. बोल्शेव्हिक.
  4. पेत्रोग्राद सोव्हियेत.


  • रशियाप्रमाणेच जगाच्या राजकीय, आर्थिक व वैचारिक क्षेत्रांत फार मोठा प्रभाव पाडणारी ही क्रांती ७ नोव्हेंबर १९१७ रोजी घडून आली. 
  • या क्रांतीमुळे रशियात सु. १४८० सालापासून चालत आलेल्या झारच्या राजेशाहीचा शेवट झाला आणि तेथे बोल्शेव्हिक कम्युनिस्टांची सत्ता स्थापन झाली.
  • इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. 
  • मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. 
  • बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.
  • रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. 
  • जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. 
  • आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. 
  • इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. 
  • त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. 
  • स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.

रशियन राज्यक्रांतीचा काही प्रमुख घटनांचा कालानुक्रम 

  • ‘ब्लडी सन्डे’ – विंटर पॅलेसवरील कामगार-मोर्चावर गोळिबार व शंभर लोकांची हत्या. :- २२ जानेवारी १९०५.
  • पोटेमकिन युध्दनौकेवरील बंडाळी. :- १४ जून १९०५.
  • रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप :- २० ऑक्टोबर १९०५.
  • सेंट पीटर्झबर्ग येथे कामगार प्रतिनिधींच्या पहिल्या सोव्हिएटची स्थापना. :- २६ ऑक्टोबर १९०५.
  • ऑल रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पक्षाचे लंडन येथील अधिवेशन :- एप्रिल १९०७.
  • पेट्रग्राड शहरातील २५,००० कामगारांचा संप. :- २८ फेब्रुवारी १९१७.
  • पेट्रग्राडमधील झारसत्तेचे उच्चाटन. :- १२ मार्च १९१७.
  • सैनिक आणि कामगार यांची हंगामी सरकारविरुध्द निदर्शने :- ३ ते ५ मे १९१७.
  • पेट्रग्राडमध्ये पहिल्या सोव्हिएट काँग्रेसची सुरुवात. :- १६ जून १९१७.
  • हंगामी सरकारविरुध्द खलाशी, कामगार व सैनिक यांचा अयशस्वी उठाव. :- १६ ते १८ जुलै १९१७.
  • बोल्शेव्हिकांव्यतिरिक्त सर्व राजकीय गटांची मॉस्कोमध्ये परिषद. तिच्या प्रतिक्रांतिवादी धोरणाविरुध्द मॉस्को कामगारांचा संप. :- २५ ते २७ ऑगस्ट १९१७.
  • पेट्रग्राडमधील सोव्हिएटे नष्ट करण्यासाठी लष्करी उपाययोजना. :- ६ सप्टेंबर १९१७.
  • मॉस्कोच्या सोव्हिएटमध्ये प्रथमच बोल्हेव्हिकांचे मताधिक्य. :- १९ सप्टेंबर १९१७.
अधिक माहितीसाठी :-


झार दुसरा निकोलस व शाही घराण्यातील इतर व्यक्तींना येकटेरिंबर्ग (स्व्हेर्डलॉव्हूस्क) येथे देहान्त शासन :- १६ जुलै १९१८.

Thursday 22 February 2018

ED म्हणजे काय..?

अंमलबजावणी संचालनालय (E.D - Enforcement directorate)


  • ही भारतामध्येआर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे. 
  • ही अर्थ मंत्रालयातील राजस्व विभागाचा एक भाग आहे. यात भारतीय महसूल सेवेतील अधिकारी काम करतात.
  • परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा तपास करण्यासाठी भारत सरकारने याची स्थापना केली.

स्थापना :- १ जून २०००.

  • मुख्यालय :- नवी दिल्ली.

उद्देश :-

  • भारत सरकारच्या दोन प्रमुख कायद्यांची अंमलबजावणी करणे हा अंमलबजावणी संचालनालयाचा प्रमुख उद्देश आहे. 
  • हे दोन कायदे आहेत.- "परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम १९९९" व "अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध, २००२".

संघटना :-


  • अंमलबजावणी संचालनालयाच काम नवी दिल्ली येथील मुख्यालयातून चालते.
  • परंतु त्यांची क्षेत्रीय कार्यालये पुढीलप्रमाणे - मुंबई, कोलकाता, दिल्ली, चंडीगढ, चेन्नई, अहमदाबाद, बंगळूर, लखनौ, कोचीन, हैदराबाद.
  • उप क्षेत्रीय कार्यालये - इंदूर, आग्रा, श्रीनगर, जयपूर, वाराणसी, कालिकत, हैदराबाद, गुवाहाटी, पणजी.
अधिक माहितीसाठी :- www.reliableacademy.com

Wednesday 14 February 2018

समाजसुधारक - रघुनाथ धोंडो कर्वे



  • जन्म :- इ.स. १४ जानेवारी, १८८२. (मुरूड)
  • मृत्यू :- इ.स. १४ ऑक्टोबर, १९५३. (मुंबई)
  • वडील :- महर्षी धोंडो केशव कर्वे.
  • आई :- राधाबाई धोंडो कर्वे.
  • पत्नी :- मालती रघुनाथ कर्वे.
  • रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.
  • समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसंबंधी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे भारतातील एक आद्य विचारवंत म्हणुन देखील त्यांची ओळख आहे.

शिक्षण 

  • पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी मॅट्रिकची (दहावी) परीक्षा दिली. मॅट्रिक परीक्षेत मुंबई राज्यात सर्वप्रथम आले.
  • इ.स. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले.
  • इ.स. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर (‘दिप्लोम्‌ दे सुदस्युपेरिअर’ पदवी) समाधान मानून त्यांना परत यावे लागले.
  • त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी मुलाखतींमध्ये नोंदविल्या. (आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४०च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध करण्यात आल्या.)
  • एल्फिन्स्टन कॉलेज - मुंबई (१९०८-१७), कर्नाटक कॉलेज - धारवाड (१९१७ - १९), डेक्कन कॉलेज - पुणे (१९२१), गुजरात कॉलेज - अहमदाबाद (१९२१ - २२) व विल्सन कॉलेज - मुंबई (१९२२) या महाविद्यालयांत गणिताचे प्राध्यापक होते. त्यांचे क्रांतीकारक विचार व बाणेदार स्वभाव यांमुळे त्यांच्या नोकरीत सतत अस्थिरता राहिली. 
  • इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.
  • फ्रेंच भाषेचे कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत.


सामाजिक कारकीर्द

  • रघुनाथ कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. 
  • तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.
  • संततिनियमनाचे केंद्र (राइट एजन्सी) ते १९२१ पासून आपली पत्नी मालतीबाई यांच्या सहकार्याने चालवत होते. 
  • त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.
  • त्यांनी १९२३ मध्ये संततिनियमन, विचार व आचार आणि १९२७ मध्ये गुप्त रोगांपासून बचाव (विचार व आचार) ही पुस्तके लिहिली. 
  • संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली.
  • कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. ‘राईट एजन्सी’ हे भारतातील पहिले कुटुंब कल्याण केंद्र होय.
  • त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय (१९४०), आधुनिक आहारशास्त्र (१९३८), आधुनिक कामशास्त्र (आवृ. २, १९३४) अशी इतरही काही शास्त्रीय विषयांचे विवरण करणारी पुस्तके लिहिली.
  • पॅरिसच्या परी (१९४६) व तेरा गोष्टी (१९४०) हे त्यांचे ललित साहित्यही उपलब्ध आहे. त्यांना रंगभूमीचेही अत्यंत आकर्षण होते. गुरुबाजी (१९३७), तार्त्युफ नाटकाचे रूपांतर) व न्यायाचा शोध (१९४६) हे चार अंकी संगीत नाटक त्याचे निदर्शक होय.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

Tuesday 13 February 2018

ताश्कंद करार



  • ताश्कंद करार, ताश्कंद डिक्लरेशन तथा ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात - रशिया) येथे इ.स. १० जानेवारी, १९६६ रोजी केला गेला. 
  • भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. 
  • भारताचे महामंत्री लालबहादूर शास्त्री पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.

पार्श्वभुमी :-

  • १९४७ साली भारत- पाकिस्तान फाळणीनंतर या दोन देशांमध्ये चिघळलेल्या सीमावादाने १९६५ मध्ये परत एकदा डोके वर काढले. 
  • ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावाने मोहीम काढून जम्मू काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. 
  • दोन्ही बाजूंचे हजारो सनिक या युद्धात मारले गेले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते असे म्हटले जाते. सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णीत अवस्थेतच थांबले. 
  • या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान चीनमध्ये अधिक जवळीक झाली. 
  • ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेली ही बठक संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली झाली.
  • व ताश्कंद डिक्लरेशन’ ऊर्फ ‘ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट’ हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी झाला.


१९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या ते पुढील प्रमाणे आहेत -

१. संयुक्त राष्ट्र - सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली. 

२. २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले. 

यांशिवाय करारातील इतर कलमे पुढीलप्रमाणे आहेत -

  • एकमेकांच्या  अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे. 
  • एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे. 
  • एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे. 
  • एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.
  • युद्धकैद्यांची अदलाबदल करणे. 
  • उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे. 
  • अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे.

अधिक माहितीसाठी :-

Friday 9 February 2018

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे



  • देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
  • महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात आहे.
  • बेसॉल्ट खडक हा दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
  • महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.
  • महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

1. दगडी कोळसा -
  • महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे.
  • देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.
  • सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर).
2. बॉक्साईट -

  • भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. 
  • महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे.
  • कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.


3. कच्चे लोखंड -

  • रेड्डी (सिंधुदुर्ग).


4. मँगेनीजचा -

  • भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. 
  • तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.
  • सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग).


5. तांबे -

  • चंद्रपूर, नागपूर.


6. चुनखडी -

  • यवतमाळ.


7. डोलोमाईट -

  • देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे. 
  • रत्नागिरी, यवतमाळ.


8. क्रोमाईट -

  • देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.
  • भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग.


9. कायनाईट -

  • देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे.
  • देहुगाव (भंडारा).


10. शिसे व जस्त -

  • नागपूर.


11. खनिज तेल -

  • मुंबईनजीक समुद्रातील ‘मुंबई हाय’ या क्षेत्रात खनिज तेल, तसेच नैसर्गिक वायू सापडतात. 
  • रायगड जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आढळतात. 
  • भारतातील सर्व प्रकारच्या खनिजांच्या सुमारे ३.३% खनिजांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. 
  • महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण या दोनच भागात प्रामुख्याने खनिजे सापडतात. त्यामुळे याच भागात खनिजाधारीत उद्योगांचा विकास झालेला आढळतो. 
  • महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ (एम.एस.एन.सी.) १९७३ मध्ये नागपूर येथे स्थापन करण्यात आले.
  • उद्देश - खनिज संपत्तीचे जास्तीतजास्त उत्पादन व विकास करणे.

  • भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिजसाठा महाराष्ट्रात आहे.

अधिक माहितीसाठी :-

Friday 2 February 2018

अर्थसंकल्प २०१८ :- ठळक तरतुदी


व्यापार -

  • मुद्रा योजनेंतर्गत ३ लाख कोटींचे कर्ज वितरित करण्याचं लक्ष्य.
  • नोटाबंदीनंतर नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांना ३७०० कोटी.
  • टेक्ट्सटाईल उद्योगासाठी ७१४० कोटी.

आरोग्य -

  • दवाखान्यातील खर्च कमी करण्यासाठी ‘हेल्थ प्रोटेक्शन स्कीम’.
  • टीबी रोखण्यासाठी ६०० कोटी.
  • १० कोटी कुटुंबासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च करणार.
  • ३ लोकसभा मतदारसंघामागे एक सरकारी वैद्यकीय रुग्णालय उभारणार.
  • देशभरात २४ नवी वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार.
  • आरोग्य सुविधांसाठी ‘आयुषमान भारत’ कार्यक्रम.
  • आरोग्यासाठी १.५ लाख कोटीची तरतूद.

पाणी - 


  • स्वच्छ पाणी योजनेसाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद.
  • अमृत योजनेअंतर्गत ५०० शहरांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणार.
  • नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत १८७ योजनांना मंजुरी.

घरे -

  • ग्रामीण भागात घरे आणि पायाभूत सुविधांसाठी १४.३४ लाख कोटी.
  • वर्षभरात ५१ लाख घरे बांधणार.
  • २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न.

शिक्षण -


  • डिजिटल शिक्षणावर भर; १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार.
  • अनुसुचित जातींच्या विकासासाठी ५६ हजार कोटी.
  • आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी एकलव्य शाळा उभारणार.
  • विद्यार्थ्यांसाठी ‘पंतप्रधान रिसर्च फेलो स्कीम’.
  • बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार.
  • देशातील शिक्षणासाठी १ लाख कोटी.
  • दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत.

महिला -


  • देशातील ८ कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन.
  • सौभाग्य योजनेतून ४ कोटी गरीब घरांना वीज कनेक्शन.
  • स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ६ कोटी शौचालयांची निर्मिती.
  • शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून कुटुंबाना ठराविक निधी उपलब्ध करुन दिला जाणार.

शेती -

  • शेतीच्या कर्जासाठी ११ लाख कोटींचा निधी राखीव.
  • शेतीतील पायाभूत सुविधा, पशुपालन, मत्स्यपालनासाठी १० हजार कोटी.
  • अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १४०० कोटी.
  • पशूपालन करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडिट कार्ड.
  • खरीप हंगामापासून हमीभावात दीडपट वाढ.
  • २०२२ मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य.

इतर -


  1. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यावर ५० हजारापर्यंतची करसवलत.
  2. टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही.
  3. २०१८-१९ आर्थिक वर्षात ३.३ टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य.
  4. एप्रिल २०१८ पासून खासदारांचा पगार वाढणार.
  5. राष्ट्रपतींना ५ लाख, उपराष्ट्रपतींना ४ लाख आणि राज्यपालांना ३ लाख रुपये वेतन मिळणार.
  6. दोन सरकारी विमा कंपन्या शेअर बाजारात येणार.
  7. विमानतळांची संख्या ५ टक्क्यांनी वाढवणार.
  8. सर्व रेल्वे स्टेशन, गाडीत वाय- फाय आणि सीसीटीव्ही सुविधा.
  9. देशभरात ६०० रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण.
  10. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष’ योजना.
  11. रेल्वेच्या विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटी.
  12. कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये सरकार १२ टक्के रक्कम देणार.
  13. वर्षभरात ७० लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती करणार.
  14. स्वच्छ पाणी योजनेसाठी २६०० कोटी.
  15. मुद्रा योजनेअंतर्गत ३ लाख कोटी रुपये कर्ज.
  16. गंगा स्वच्छतेसाठी १८७ योजनांना मंजुरी.
  17. १० कोटी कुटुंबासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च करणार.
  18. आरोग्य सुविधांसाठी ‘आयुषमान भारत’ कार्यक्रम.
  19. आरोग्यासाठी १.५ लाख कोटीची तरतूद.
  20. आरोग्य सुधारणा केंद्र उभारण्यासाठी १२०० कोटी.
  21. देशातील शिक्षणासाठी १ लाख कोटी.
  22. आदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल उभारणार.
  23. १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार.
  24. ‘ऑपरेशन फ्लड’ प्रमाणेच ‘ऑपरेशन ग्रीन’ लाँच करणार.
  25. ८ कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देणार.
  26. ४ कोटी घरांना मोफत वीजजोडणी देणार.
  27. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत ६ कोटी शौचालय बांधणार.
  28. शेतीच्या कर्जासाठी ११ लाख कोटींचा निधी राखीव.
  29. ऑपरेशन ग्रीनसाठी ५०० कोटींची तरतूद.
  30. पशूधन विकास आणि मत्स्योद्योगांसाठी १० हजार कोटी.
  31. राष्ट्रीय बांबू मिशनसाठी २९० कोटी.
  32. इंम्पोर्टेड मोबाईल फोनवर कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 20 टक्के केलाय त्यामुळे मोबाईल महागणार आहे. तसंच टीव्हीच्या साहित्यावरही कस्टम ड्युटी 5 टक्के वाढवण्यात आलाय. त्यामुळे टीव्हीही महाग होणार आहे.

अधिक माहितीसाठी :-

Thursday 1 February 2018

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो ?



  • २०१८-१९ साठी चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०१८ रोजी संसदेत सादर केला गेला. पण हा अर्थसंकल्प तयार कसा केला जातो आणि काय त्याची प्रक्रिया आहे ते जाणून घेऊया..!
  • आतापर्यंत दरवर्षी मुख्य बजेट आणि रेल्वे बजेट असे दोन बजेट सादर व्हायचे पण मोदी सरकारने दोन वर्षापूर्वी सप्टेंबर मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार मागच्या वर्षी पासून रेल्वे बजेट हे मुख्य बजेट मधेच सादर करण्यात येतो.

अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थ खात्यात स्वतंत्र विभाग आहे. सामान्यपणे बजेट ची तयारी आदल्या वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सुरु होते, म्हणजे बजेट ची तयारी ते सादरीकरण यासाठी वर्षातील पाच ते सहा महिन्यांचा कालावधी यात जातो.

  • सर्वप्रथम सर्व मंत्रालयांना, राज्यांना आणि स्वायत्त संस्थांना पुढच्या वर्षीच्या खर्चाचा आराखडा सादर करण्याची सूचना दिली जाते आणि हा आराखडा मिळाल्यानंतर मंत्रालयांशी त्यावर सल्लामसलत केली जाते. याचबरोबर शेतकरी, व्यापारी, उद्योगपती, अर्थतज्ज्ञ आणि सामान्य लोकांचं मत घेतलं जात.
  • साधारणपणे डिसेंबर महिन्यात अर्थसंकल्पाचा first cut म्हणजेच कच्चा आराखडा तयार केला जातो. हा कच्चा आराखडा नेहमी निळ्या कागदावरच बनविला जातो. 
  • बऱ्याच बैठकांनंतर हा आराखडा फायनल केला जातो आणि मग अर्थमंत्र्यांकडून कर प्रस्तावावर (Tax proposal) निर्णय घेतला जातो.

अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घेतली जाते.


  • अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मंत्रिमंडळाला थोडक्यात बजेट मधील तरतुदींविषयी सांगितलं जातं. 

अर्थसंकल्पीय भाषणाबरोबर हा अर्थसंकल्प राज्य सभेत मांडला जातो. या भाषणाचे दोन भाग असतात :-

१) सर्वसाधारण आर्थिक सर्वेक्षण आणि धोरण.

२) कर प्रस्ताव.

  • त्यानंतर या अर्थसंकल्पावर सभासदांच्या भाषणानंतर विनियोजन विधेयक (Appropriation Bill) मांडलं जातं आणि त्यावर मतदान घेतलं जातं.
  • हे अर्थसंकल्प लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात संमत व्हावं लागतं आणि ते सादर केल्यानंतर ७५ दिवसांच्या आत राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण होते…!

बजेट संबंधी काही महत्वाच्या माहिती


  • भारतीय राज्यघटनेत बजेट नावाचा शब्द नाही. कलम ११२ नुसार सरकार ‘Annual Financial Statement’ सादर करतं ज्यालाच बजेट म्हटलं जातं.
  • बजेट हे काही मोजक्या अधिकारी आणि नोकरवर्ग यांच्याकडून तयार केलं जातं.
  • बजेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी कॉम्प्युटर्स सर्व networks पासून तोडली जातात.
  • अर्थ खात्याच्या इमारतीच्या तळघरात असलेल्या छापखान्यात बजेट ची छपाई केली जाते.
  • संसदेत अर्थसंकल्प सादर व्हायच्या फक्त १० मिनिटं आधीच अर्थसंकल्पाची प्रत दिली जाते.
  • बजेट तयार करणाऱ्या आणि छापणाऱ्या सर्व स्टाफ ची राहण्याची सोय अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक मध्ये केली जाते. (यामुळेच डिसेंबर महिन्यापासूनच अर्थखात्याने प्रसारमाध्यमांचा नॉर्थ ब्लॉकमधला प्रवेश बंद केला होता.)
  • बजेट संसदेत सादर केल्यानंतरच या स्टाफला घरी जाण्याची परवानगी दिली जाते.
  • या सर्व स्टाफ च्या हालचालींवर आणि फोने कॉल्स वर आयबी कडून बारीक नजर ठेवली जाते. आणि त्यांना देण्यात येणाऱ्या खाण्याची तपासणी केली जाते.
  • बजेट सीक्रेट ठेवण्यासाठी पत्रकारांना अर्थ मंत्रालयात येण्यास मनाई केली जाते.

  • या सर्व गोष्टी करण्यामागे कारण हे असते की बजेट सदर होण्याच्या आधी त्याची गोपनीयता कसोशीने पाळली जावी. हे बजेट एकदा संसदेत सादर झाल्यानंतर ते अर्थखात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येते.
  • अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांनी लोकसभेत २ ते ३ दिवस त्यातील तरतुदींवर चर्चा करण्यात येते.
  • त्यानंतर नवीन वित्तीय वर्षांतील पहिल्या काही महिन्यांच्या अनिवार्य खर्चासाठी संसदेची परवानगी घेतली जाते.
  • संपूर्ण चर्चेच्या शेवटी अर्थमंत्री आपला अभिप्राय नोंदवणारे भाषण करतात. त्यानंतर काही निश्चित कालावधीसाठी सभागृह संस्थिगत करण्यात येते.

अर्थसंकल्पाचा इतिहास

  1. भारताचा अर्थसंकल्प १५० वर्ष जुना आहे.
  2. पहिला अर्थसंकल्प इंग्रज सरकारचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. 
  3. तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प देशाचे पहिले अर्थमंत्री आरके षणमुखम शेट्टी यांनी सादर केला होता.



अधिक माहितीसाठी :-

Friday 26 January 2018

🇮🇳 ‘प्रजासत्ताक दिन’ (गणराज्य दिन) 🇮🇳



  • भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. 
  • जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
  • २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.

काय आहे भारताचे संविधान

  • भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे.
  • १९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) आधारित आहे.
  • ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या  कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती.
  • १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
  • पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थिती होते . 
  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.
  • २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. 
  • संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. 
  • बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी ) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.


संविधानाची काही ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे : 

१.संसदीय लोकशाही,
२.मूलभूत अधिकार,
३.सामाजिक न्याय,
४.न्यायालयीन पुनर्विलोकन,
५.संघराज्य पद्धती,
६.मार्गदर्शक तत्त्वे.

२६ जानेवारीचे संचलन


  • स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. 
  • भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. 
  • हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. 
  • संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. 
  • भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. 
  • राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते.
  • त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. 
  • राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.
  • प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.{राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान - संयुक्त अरब अमिराती (२०१७ चे प्रमुख पाहुणे)}.
  • आशियान शिखर परिषदेतील नेते २०१८ च्या 'प्रजासत्ताक' दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


🇮🇳 जय हिंद 🇮🇳  
       🇮🇳 जय भारत 🇮🇳
             🇮🇳 जय महाराष्ट्र 🇮🇳


अधिक माहितीसाठी :-

Friday 19 January 2018

वंगभंग चळवळ


सुरूवात - १६ ऑक्टोबर १९०५ रोजी.

  • मूळ कल्पना - सर विल्यम वार्ड (१८९६).
  • फाळणीस विरोध - सर हेन्री काटन (१८९६).
  • फाळणी विरोधात स्वदेशी चळवळीस सुरूवात - १७  ऑगस्ट १९०५.
  • वंगभंग चळवळ सुरु करण्यामागील कारण.- बंगालच्या फाळणीच्या विरोधात.

वंगभंग चळवळ

  • बंगालच्या फळणीविरोधी स्वदेशी तसेच वंगभंग आंदोलन या नावाने ओळखळे जात स्वदेशी चळवळीचा मुख्य कार्यक्रम चतुःसूत्री होय.
  • बंगाल प्रांताची फाळणी करण्याच्या ब्रिटिश राजवटीच्या धोरणाविरुद्ध झालेली १९०४-१९०५ ची चळवळ म्हणुन देखील ओळखली जाते.
  • ह्या चळवळीने राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालांचा गट लोकप्रिय बनण्यास मदत झाली.
  • ब्रिटिश काळातील बंगाल प्रांत, विद्यमान पश्चिम बंगाल राज्य, बांगला देश, बिहार आणि ओरिसा एवढा भौगोलिक दृष्ट्या अवाढव्य होता. 
  • प्रशासनाच्या सोयीसाठी बंगालची फाळणी कशी करावी, यावर सुमारे दहा वर्षे चर्चा चालू होती. अखेर ही फाळणी राजकीय हितासाठी करण्याचे ठरले.
  • डिसेंबर १९०३ च्या अधिकृत पत्रकान्वये पूर्व बंगालचे चितगाँग, मैमनसिंग व टिपेरा हे तीन जिल्हे आसामला जोडण्याची योजना सरकारच्या विचाराधीन होती.
  • फेब्रुवारी १९०४ मध्ये व्हाइसरॉय कर्झनने ब्रिटिश सरकारला लिहिले की, ‘बंगाल्यांच्या आरडा ओरड्याला भिऊन आपण जर कच खाल्ली, तर बंगालला खच्ची करण्याची दुसरी संधी यानंतर मिळणार नाही’.
  • पूर्व बंगाल-आसामच्या नव्या प्रांतात मुसलमानांची प्रभावी बहुसंख्या असेल व ते त्यांना फायदेशीरच होईल, असे कर्झनने आवर्जून सांगितले.
  • फाळणीविरोधी आंदोलनाला शह देण्यासाठी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली बेजार झालेल्या डाक्क्याच्या नबाबांना कर्जमुक्त करण्यासाठी नाममात्र व्याजावर दीर्घमुदतीचे चौदा लाख रूपयांचे कर्ज सरकारी तिजोरीतून देण्यात आले. मुसलमानांमध्ये फाळणीचा जबरदस्त पुरस्कार केला; पण त्याचा प्रभाव पडला नाही.
  • बंगाली मुसलमानही वंगभंग चळवळीत हिरिरीने सहभागी झाले. शेवटी डाक्का नबाबांनी डाक्क्यालाच मुस्लिम लीगचे स्थापना अधिवेशन भरविले. १९०५ च्या ऑगस्टमध्ये फाळणीचा निर्णय घोषित करण्यात आला.
  • १६ ऑक्टोबर रोजी फाळणी अंमलात आली.
  • गो. कृ. गोखले इंग्लंडला गेले. व फाळणी रद्द व्हावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले; पण त्याचा उपयोग झाला नाही.
  • जून १९०८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदुस्थानच्या परिस्थितीवर चर्चा झाली. तेव्हा बंगाल फाळणीमुळेच भारतात असंतोष दीर्घकाळ भडकत राहिला आहे; बंगालची फाळणी करण्याऐवजी बिहार आणि ओरिसा वेगळे केले असते, तर लोकांचा रोष पतकरावा लागला नसता, असे अनेक सभासदांनी स्ष्टपणे बोलून दाखविले.
  • फेब्रुवारी १९०६ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलताना भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांनी लोकांच्या भावनेची कदर न करता फाळणी करण्यात आली आहे, हे मान्य करूनही फाळणीचा निर्णय ही काळ्या दगडवरची रेघ आहे, असे जाहीर केले.
  • १९११ मध्ये आपल्या भारतभेटीच्या वेळी नूतन बादशाहा पंचम जॉर्ज यांनी हिंदुस्थानात आणि लॉर्ड मोर्ले यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये फाळणी रद्द केल्याचे घोषित केले


वंगभंग चळवळी दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या घटना -

  • जनरल लॉर्ड कर्झन १८९९ साली भारताचा गवर्नर जनरल झाला. व त्याने १९०५ साली बंगालची फाळणी केली.
  • १९०५ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बनारस येथे झाले. आणि त्याचे नामदार गोपाळ कृष्ण गोखले अध्यक्ष झाले.
  • १९०६ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोलकाता येथे व दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते.
  • लोकमान्य टिळकांना मंडालेचा तुरुंगात ६ वर्षे कारावास झाला.
  • १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली.
  • १९०९ साली मोर्ले मिंटो कायदा आला.
  • १९१६ साली लखनौ करार झाला.
  • १९१४ साली पहिले महायुद्ध व १९१९ साली दुसरे युद्ध झाले.
  • अँनी बेझंट व टिळक यांनी होमरूल चळवळ स्थापन केली.
  • १९१९ साली मोन्टेग्यू चेम्स्फार्ड कायदा स्थापना झाला.
  • १९२० साली लोकमान्य टिळकांनी निधन झाले.


अधिक माहितीसाठी :-

Thursday 18 January 2018

सत्यशोधक समाज - महात्मा फुले

स्थापना - सप्टेंबर २४, इ.स. १८७३.

सत्यशोधक समाजाचे ध्येय - पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे.

  • घोष वाक्य - ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’
  • सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ - सार्वजनिक सत्यधर्म'.
  • `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.
  • सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
  • सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.

सत्यशोधक समाजाचे कार्य 

  • सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले. 
  • दीनबंधू , दीनमित्र वगैरे वृत्तपत्र-मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीने मांडली. 
  • शेतकऱ्याचा आसूड मधून म. फुल्यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘ डेक्कन अ‍ॅगिकल्चर रिलिफ अ‍ॅक्ट ’ संमत झाला.
  • दीनबंधू वृत्तपत्राने गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला.
  • नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘ मिलहँड असोसिएशन ’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली. तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. 
  • जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्म ह्या गंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला. 
  • तसेच अनिष्ट अंधश्रद्धामूलक परंपरा, चालीरीती, रूढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. 
  • १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. 
  • शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. 
  • एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले.
  • सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

सत्यशोधक समाजाची अधिवेशने/संमेलने 

  • १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली; मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. 
  • १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. 
  • पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले.
  • तर, पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

अधिक माहिती करीता :-

Tuesday 16 January 2018

१० वी पंचवार्षिक योजना


कालावधी - इ.स. २००० ते इ.स. २००२.

प्राधान्य - शिक्षण व प्राथमिक शिक्षणावर भर.

घोषवाक्य - सर्वसामान्य विकासाचे धोरण.


  • सर्वाधिक खर्च - सामाजिक सेवा (२७%).

 उद्दिष्ट -


  • आर्थिक विकास ८ टक्के महत्वाकांक्षी दराने साध्य करणे.
  • दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण ५ टक्के ने कमी करून ते २१ टक्के वर आणणे आणि २०१२ पर्यंत १० टक्के वर आणणे.
  • २००७ पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कऱणे. साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के पर्यंत नेणे.
  • नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण २००७ पर्यंत प्रतिहजार ४५ तर २०१२ पर्यंत २८ पर्यंत कमी करणे.
  • २००७ पर्यंत जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र २५ टक्के पर्यंत करणे.
  • २००७ पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. सर्व प्रमुख मोठ्या प्रदूषित नद्यांचे आणि २०१२ पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे.
  • २००१ - २०११ या दशकांसाठीचा जननदक १६.२ टक्के इतका कमी करणे.

महत्वपूर्ण घटना -


  1. या योजनेदरम्यान  ७.६.% एवढी सरासरी वर्षीक वृद्धी दर प्राप्त झाला.
  2. उद्योग व सेवा या अर्थव्यवस्थांच्या दोन प्रमुख क्षेत्रांमधील वृद्धी दर साध्य झाला.
  3. कृषि क्षेत्र २.१३% वार्षिक वृद्धीचे लक्ष्य होते. साध्य प्राप्त आकड्यांनुसार केवळ २.१३% एवढा वृद्धी दर प्राप्त झाला.
  4. या योजनेत चालू किमतीची गुंतवणूक दर जीडीपीच्या ३.०८% राहिला, त्याचे लक्ष्य २८.४१% एवढे होते.
  5. योजना कालावधीत चलन वाढीचा दर सरासरी ५% ठेवण्याचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात तो ५.१% एवढा ठरला.

अधिक माहितीसाठी :-

Sunday 14 January 2018

त्रिभुज प्रदेश



  • त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय.
  • नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात.
  • मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

त्रिभुज प्रदेशाची निर्मिती 


  • त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते.
  • एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :-


  1. नदीतील गाळाचे प्रमाण.
  2. नदीचा मुखाजवळील वेग.
  3. सागराची खोली.
  4. त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य

सागरप्रवाह.


  • नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. 
  • वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. 
  • खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. 
  • खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. 
  • नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. 
  • उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. 
  • त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.

उदाहरणे



  • भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्यांचे त्रिभुज प्रदेश आहे.
  • गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, र्‍हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. 
  • मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० चौ.कि.मी. पेक्षा अधिक आहे.

अधिक माहितीसाठी -

Wednesday 10 January 2018

ऊती (जीवशास्त्र)


  • ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात.
  •  ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची पुढची पायरी आहे. 
  • एकपेशीय फलित अंड्याचे विभाजन होऊन पेशींचा एकच थर असलेले कोरक गोल (ब्लास्ट्युला) तयार होतात, या अवस्थेत ऊती अजून बनलेल्या नसतात. 
  • कोरक गोलापासून आद्यभ्रूणन प्रक्रियेत बाह्यस्तर, मध्यस्तर आणि अंत:स्तर असे तीन जननस्तर तयार होतात. या प्रक्रियेतील पेशीविभेदनातून ऊतिनिर्मिती सुरू होते आणि इंद्रिये वा अंगे पूर्ण तयार होईपर्यंत चालू राहते. 
  • एकाच प्रकारच्या ऊतीतील पेशी या कमीजास्त प्रमाणात एकसारख्याच असतात आणि एकाच प्रकारचे कार्य करतात.
  • अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती  एकत्र काम करतात. 
  • सर्व साजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र येउन अवयव बनवतात, हे अवयव एकत्र येउन अवयव संस्था तयार होते.  उदा. श्वासंसंस्त्था, पचनसंस्था इ.

पेशी -> ऊती -> अवयव -> अवयव संस्था -> सजीव.

प्राण्यांचे ऊती

प्राणी ऊतींचे चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात :
अभिस्तर ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, संयोजी ऊती.

  • अभिस्तर उती :-
  1. अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. 
  2. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतूमय पटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असते. 
  3. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात. 
  • अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत -
  1. सरल पटट्की अभिस्तर.
  2. स्तरीत पटट्की अभिस्तर.
  3. स्तम्भीय अभिस्तर.
  4. रोमक स्तम्भीय अभिस्तर.
  5. घनाभरूप अभिस्तर.
  6. ग्रंथिल अभिस्तर.
  • संयोजी उती :-
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारराकांमध्ये पेशी रुतलेल्या असतात.
या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते.

संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात :
  1. अस्थी.
  2. रक्त.
  3. अस्थिबंध.
  4. स्नायुरज्जू.
  5. कास्थी.
  6. विरल उती.
  7. चरबीयुक्त उती.
  • स्नायू उती :-
स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास 'संकोची प्रथिन' असे म्हणतात या प्रथिनानच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते.
  • चेता उती :-
सर्व पेशींमध्ये चेतना क्षमता आढळते. या उती चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात.

मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.

वनस्पती ऊती

वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
साध्या ऊती व संयुक्त ऊती.


  • साध्या ऊती :-
या ऊतींचे मूलोती, स्थूलकोनोती आणि दृढोती असे तीन प्रकार आहेत :- मूलोती (मूलभूत ऊती) यांमधील पेशी जिवंत, पेशीभित्तिका पातळ.

मूलोती (मूलभूत ऊती) -
पेशी एकमेकांना चिकटून असल्या तरी पेशींच्या दरम्यान जागा असते.
पाणी, अन्न साठविणे, तसेच आधार देणे असे यांचे कार्य आहे.

स्थूलकोनोति -
या ऊती मूलोतीप्रमाणेच जिवंत पेशींच्या बनलेल्या असतात, मात्र पेशींच्या दरम्यान पेशीभित्तिका जाड झाल्यामुळे जागा नसते.
त्यामुळे जिथे या ऊती असतात त्या भागाला आधार देणे हे यांचे कार्य आहे.
त्या पाणी, अन्नसुद्धा साठवितात.

दृढोती -
या ऊतींमधील पेशी मृत असतात. त्यांच्या पेशीभित्तिकावर आतील बाजूस लिग्नेनचा थर असल्यामुळे भिंती जाड असतात.
यांचे मुख्य कार्य आधार देणे आहे


  • संयुक्त ऊती 

एकापेक्षा जास्त प्रकारच्या जास्त प्रकारच्या साध्या ऊती एकत्र येऊन संयुक्त ऊती बनतात. त्यांचे कार्य अन्नरस, पाणी यांचे वहन करणे.
संयुक्त ऊतीचे काष्ठ व रसवाहिनी असे दोन प्रकार आहेत.

काष्ठ -
या संयुक्त ऊतीमध्ये काष्ठमूलोती, काष्ठदृढोती, वाहिका, वाहिनी अशा पेशी असतात मुळांनी शोषिलेले पाणी खोडातून इतर अवयवांकडे वाहून नेणे हे कार्य काष्ठ करते.

रसवाहिनी -
ही संयुक्त ऊती रसमूलोती, रसदृढोती, चाळणी नलिका, चाळणी पेशी यांपासून बनलेली असते. पानांनी तयार केलेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांकडे वाहून नेणे हे यांचे कार्य आहे.


अधिक माहितीसाठी
www.reliableacademy.com

Tuesday 9 January 2018

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल - वॉरन हेस्टिंग्स


जन्म -  इ.स. ६ डिसेंबर १७३२ (चर्चिल - इंग्लंड)


मृत्यु - इ.स.  २२ ऑगस्ट १८१८ (डेल्सफोर्ड - इंग्लंड)

  • वॉरन हेस्टिंग्स हा हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता.
  • कारकीर्द सुरु - २० ऑक्टोबर १७७३ (originally joined on २८ एप्रिल १७७२).
  • कार्यकाल समाप्त - १ फेब्रुवारी १७८५.

बालपण -

  • हेस्टिंग्सचा जन्म व बालपण हलाखीच्या परिस्थितीतील होते.
  • वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये शिकायला असताना हा युनायटेड किंग्डमचा भविष्यातील पंतप्रधान लॉर्ड शेल्बर्न आणि विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक तसेच कवी विल्यम काउपर यांचा समकालीन होता.

भारतातील कार्यकाल 

  • हेस्टिंग्स १७५०मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरीला लागला व त्यासाठी कोलकात्यास आला.
  • त्याच्या कष्टाचे चीज म्हणून त्याला कासीमबझार येथे बढतीसह पाठविण्यात आले. म्हणुन त्याची कासिमबाझार येथे नियुक्ती करण्यात आली (१७५३). 
  • तेथील वास्तव्यात त्याने फार्सी, बंगाली आणि ऊर्दू या भाषा व एतद्देशीय रीतिरिवाजांचे ज्ञान प्राप्त करून घेतले. 
  • कंपनीने त्याची एका व्यापारपेढीवर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. 
  • त्याने कलकत्ता घेण्यासाठी लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्हबरोबर युद्धात भाग घेतला (१७५६). 
  • त्यानंतर त्याची बंगालच्या वखारीत (फॅक्टरी) रेसिडेन्ट म्हणून निवड झाली (१७५७). तेथील कार्यक्षम कामगिरीमुळे कलकत्त्याच्या मंडळात तो प्रविष्ट झाला (१७६१); तथापि तेथील भ्रष्टाचार व गैरकारभार यांमुळे त्याने आपल्या मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तो इंग्लंडला परतला (१७६४). 
  • पुन्हा त्याची ईस्ट इंडिया कंपनीने १७६९ मध्ये मद्रास येथील काउन्सिलवर नेमणूक केली. त्याच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यास बंगालचा गव्हर्नर नेमले (१७७१) आणि पुढे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या उच्च पदावर त्याची नियुक्ती झाली (१७७४). 
  • तत्पूर्वी १७७३ मध्ये ब्रिटिश संसदेने रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट संमत करून बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देऊन त्याचा अधिकार मुंबई-मद्रास येथील गव्हर्नरांवर निश्चित केला आणि त्याच्या मदतीस चार ब्रिटिश सदस्यांचे मंडळ दिले. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनव्यवस्थेला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले.
  • तेथे त्याने विल्यम वॉट्सच्या देखरेखीखाली पूर्व भारतातील राजकारणाचे धडे घेतले. 
  • याच सुमारास बंगालचा नवाब अलिवर्दी खान मृत्यूशय्येवर होता व त्याचा नातू सिराज उददौला सत्तेवर येणे अपेक्षित होते. 
  • सिराज उददौला युरोपीय लोकांच्या विरुद्ध होता व त्यांच्या राजकीय लुडबुडीस त्याचा सक्त विरोध होता. 
  • सत्तेवर आल्याआल्या बंगालच्या सैन्याने युरोपीय ठाण्यांवर हल्ले चढविले. त्यात कासीमबझारच्या इंग्लिश ठाण्यासही वेढा घातला गेला.
  • आपल्यापेक्षा अनेकपटींनी मोठ्या असलेल्या शत्रूसैन्याविरुद्ध ब्रिटिशांनी शरणागती पत्करली.
  • बंगाली, फार्सी, उर्दू या भाषांव्यतिरिक्त हेस्टिंग्जला अरबी भाषेचेही जुजबी ज्ञान होते.
  • त्याने कलकत्त्यात मद्रसा स्थापन केली (१७८१). त्याने संस्कृत भाषेच्या उत्तेजनार्थ नथॅन्यल हॅलहेडकडून हिंदू विधीचे भाषांतर करून घेतले. 
  • त्याचा मित्र सर चार्ल्स विल्किन्स हा संस्कृत व फार्सी भाषांचा जाणकार होता. विल्किन्सने भगवद्गीते चा इंग्रजी अनुवाद केला. थोर प्राच्यविद्यातज्ज्ञ सर विल्यम जोन्स याने मनुस्मृती चे भाषांतर केले (१७८३). 
  • जोन्स, विल्किन्स व हॅलहेड यांच्या सहकार्याने हेस्टिंग्जने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याने संस्कृत पंडितांकरवी संस्कृत साहित्य, उपनिषदे, भगवद्गीता यांतील ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले.

वॉरन हेस्टिंग्सच्या कार्यकाळातील प्रमुख घटना


  • रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट, १७७३.
  • Supreme Council Of Bengal.
  • बंगाल एशियाटिक सोसायटी.
  • शाह आलम दुसरा या मुघल सम्राटाचे पेन्शन बंद केले.
  • Stopped Diarchy in Bengal.
  • जॉनथन डंकन द्वारा नवीन संस्कृत शाळा.
  • टांकसाळ मुर्शिदाबाद वरून कोलकाताला हलवली.
  • बंगाल गॅझेट - पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध.
  • पहिले आंग्ल - मराठा युद्ध (१७७५–८२).
  • दूसरे आंग्ल - म्हैसूर युद्ध (१७८०–८४ ).
  • पहिले रोहिला युद्ध १७७३–१७७४.
  • दुसरा रोहिला - उठाव १७७९.
  • Experimentation on land settlements. (१७७२-five years settlement, changed to १ year in १७७६).
  • भगवतगीता चे इंग्रजीत भाषांतर.

अधिक माहितीसाठी -