सुरूवात - १६ ऑक्टोबर १९०५ रोजी.
- मूळ कल्पना - सर विल्यम वार्ड (१८९६).
- फाळणीस विरोध - सर हेन्री काटन (१८९६).
- फाळणी विरोधात स्वदेशी चळवळीस सुरूवात - १७ ऑगस्ट १९०५.
- वंगभंग चळवळ सुरु करण्यामागील कारण.- बंगालच्या फाळणीच्या विरोधात.
वंगभंग चळवळ
- बंगालच्या फळणीविरोधी स्वदेशी तसेच वंगभंग आंदोलन या नावाने ओळखळे जात स्वदेशी चळवळीचा मुख्य कार्यक्रम चतुःसूत्री होय.
- बंगाल प्रांताची फाळणी करण्याच्या ब्रिटिश राजवटीच्या धोरणाविरुद्ध झालेली १९०४-१९०५ ची चळवळ म्हणुन देखील ओळखली जाते.
- ह्या चळवळीने राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालांचा गट लोकप्रिय बनण्यास मदत झाली.
- ब्रिटिश काळातील बंगाल प्रांत, विद्यमान पश्चिम बंगाल राज्य, बांगला देश, बिहार आणि ओरिसा एवढा भौगोलिक दृष्ट्या अवाढव्य होता.
- प्रशासनाच्या सोयीसाठी बंगालची फाळणी कशी करावी, यावर सुमारे दहा वर्षे चर्चा चालू होती. अखेर ही फाळणी राजकीय हितासाठी करण्याचे ठरले.
- डिसेंबर १९०३ च्या अधिकृत पत्रकान्वये पूर्व बंगालचे चितगाँग, मैमनसिंग व टिपेरा हे तीन जिल्हे आसामला जोडण्याची योजना सरकारच्या विचाराधीन होती.
- फेब्रुवारी १९०४ मध्ये व्हाइसरॉय कर्झनने ब्रिटिश सरकारला लिहिले की, ‘बंगाल्यांच्या आरडा ओरड्याला भिऊन आपण जर कच खाल्ली, तर बंगालला खच्ची करण्याची दुसरी संधी यानंतर मिळणार नाही’.
- पूर्व बंगाल-आसामच्या नव्या प्रांतात मुसलमानांची प्रभावी बहुसंख्या असेल व ते त्यांना फायदेशीरच होईल, असे कर्झनने आवर्जून सांगितले.
- फाळणीविरोधी आंदोलनाला शह देण्यासाठी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली बेजार झालेल्या डाक्क्याच्या नबाबांना कर्जमुक्त करण्यासाठी नाममात्र व्याजावर दीर्घमुदतीचे चौदा लाख रूपयांचे कर्ज सरकारी तिजोरीतून देण्यात आले. मुसलमानांमध्ये फाळणीचा जबरदस्त पुरस्कार केला; पण त्याचा प्रभाव पडला नाही.
- बंगाली मुसलमानही वंगभंग चळवळीत हिरिरीने सहभागी झाले. शेवटी डाक्का नबाबांनी डाक्क्यालाच मुस्लिम लीगचे स्थापना अधिवेशन भरविले. १९०५ च्या ऑगस्टमध्ये फाळणीचा निर्णय घोषित करण्यात आला.
- १६ ऑक्टोबर रोजी फाळणी अंमलात आली.
- गो. कृ. गोखले इंग्लंडला गेले. व फाळणी रद्द व्हावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले; पण त्याचा उपयोग झाला नाही.
- जून १९०८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदुस्थानच्या परिस्थितीवर चर्चा झाली. तेव्हा बंगाल फाळणीमुळेच भारतात असंतोष दीर्घकाळ भडकत राहिला आहे; बंगालची फाळणी करण्याऐवजी बिहार आणि ओरिसा वेगळे केले असते, तर लोकांचा रोष पतकरावा लागला नसता, असे अनेक सभासदांनी स्ष्टपणे बोलून दाखविले.
- फेब्रुवारी १९०६ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलताना भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांनी लोकांच्या भावनेची कदर न करता फाळणी करण्यात आली आहे, हे मान्य करूनही फाळणीचा निर्णय ही काळ्या दगडवरची रेघ आहे, असे जाहीर केले.
- १९११ मध्ये आपल्या भारतभेटीच्या वेळी नूतन बादशाहा पंचम जॉर्ज यांनी हिंदुस्थानात आणि लॉर्ड मोर्ले यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये फाळणी रद्द केल्याचे घोषित केले
वंगभंग चळवळी दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या घटना -
- जनरल लॉर्ड कर्झन १८९९ साली भारताचा गवर्नर जनरल झाला. व त्याने १९०५ साली बंगालची फाळणी केली.
- १९०५ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बनारस येथे झाले. आणि त्याचे नामदार गोपाळ कृष्ण गोखले अध्यक्ष झाले.
- १९०६ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोलकाता येथे व दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते.
- लोकमान्य टिळकांना मंडालेचा तुरुंगात ६ वर्षे कारावास झाला.
- १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली.
- १९०९ साली मोर्ले मिंटो कायदा आला.
- १९१६ साली लखनौ करार झाला.
- १९१४ साली पहिले महायुद्ध व १९१९ साली दुसरे युद्ध झाले.
- अँनी बेझंट व टिळक यांनी होमरूल चळवळ स्थापन केली.
- १९१९ साली मोन्टेग्यू चेम्स्फार्ड कायदा स्थापना झाला.
- १९२० साली लोकमान्य टिळकांनी निधन झाले.
अधिक माहितीसाठी :-