Tuesday 9 January 2018

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल - वॉरन हेस्टिंग्स


जन्म -  इ.स. ६ डिसेंबर १७३२ (चर्चिल - इंग्लंड)


मृत्यु - इ.स.  २२ ऑगस्ट १८१८ (डेल्सफोर्ड - इंग्लंड)

  • वॉरन हेस्टिंग्स हा हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता.
  • कारकीर्द सुरु - २० ऑक्टोबर १७७३ (originally joined on २८ एप्रिल १७७२).
  • कार्यकाल समाप्त - १ फेब्रुवारी १७८५.

बालपण -

  • हेस्टिंग्सचा जन्म व बालपण हलाखीच्या परिस्थितीतील होते.
  • वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये शिकायला असताना हा युनायटेड किंग्डमचा भविष्यातील पंतप्रधान लॉर्ड शेल्बर्न आणि विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक तसेच कवी विल्यम काउपर यांचा समकालीन होता.

भारतातील कार्यकाल 

  • हेस्टिंग्स १७५०मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरीला लागला व त्यासाठी कोलकात्यास आला.
  • त्याच्या कष्टाचे चीज म्हणून त्याला कासीमबझार येथे बढतीसह पाठविण्यात आले. म्हणुन त्याची कासिमबाझार येथे नियुक्ती करण्यात आली (१७५३). 
  • तेथील वास्तव्यात त्याने फार्सी, बंगाली आणि ऊर्दू या भाषा व एतद्देशीय रीतिरिवाजांचे ज्ञान प्राप्त करून घेतले. 
  • कंपनीने त्याची एका व्यापारपेढीवर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. 
  • त्याने कलकत्ता घेण्यासाठी लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्हबरोबर युद्धात भाग घेतला (१७५६). 
  • त्यानंतर त्याची बंगालच्या वखारीत (फॅक्टरी) रेसिडेन्ट म्हणून निवड झाली (१७५७). तेथील कार्यक्षम कामगिरीमुळे कलकत्त्याच्या मंडळात तो प्रविष्ट झाला (१७६१); तथापि तेथील भ्रष्टाचार व गैरकारभार यांमुळे त्याने आपल्या मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तो इंग्लंडला परतला (१७६४). 
  • पुन्हा त्याची ईस्ट इंडिया कंपनीने १७६९ मध्ये मद्रास येथील काउन्सिलवर नेमणूक केली. त्याच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यास बंगालचा गव्हर्नर नेमले (१७७१) आणि पुढे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या उच्च पदावर त्याची नियुक्ती झाली (१७७४). 
  • तत्पूर्वी १७७३ मध्ये ब्रिटिश संसदेने रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट संमत करून बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देऊन त्याचा अधिकार मुंबई-मद्रास येथील गव्हर्नरांवर निश्चित केला आणि त्याच्या मदतीस चार ब्रिटिश सदस्यांचे मंडळ दिले. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनव्यवस्थेला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले.
  • तेथे त्याने विल्यम वॉट्सच्या देखरेखीखाली पूर्व भारतातील राजकारणाचे धडे घेतले. 
  • याच सुमारास बंगालचा नवाब अलिवर्दी खान मृत्यूशय्येवर होता व त्याचा नातू सिराज उददौला सत्तेवर येणे अपेक्षित होते. 
  • सिराज उददौला युरोपीय लोकांच्या विरुद्ध होता व त्यांच्या राजकीय लुडबुडीस त्याचा सक्त विरोध होता. 
  • सत्तेवर आल्याआल्या बंगालच्या सैन्याने युरोपीय ठाण्यांवर हल्ले चढविले. त्यात कासीमबझारच्या इंग्लिश ठाण्यासही वेढा घातला गेला.
  • आपल्यापेक्षा अनेकपटींनी मोठ्या असलेल्या शत्रूसैन्याविरुद्ध ब्रिटिशांनी शरणागती पत्करली.
  • बंगाली, फार्सी, उर्दू या भाषांव्यतिरिक्त हेस्टिंग्जला अरबी भाषेचेही जुजबी ज्ञान होते.
  • त्याने कलकत्त्यात मद्रसा स्थापन केली (१७८१). त्याने संस्कृत भाषेच्या उत्तेजनार्थ नथॅन्यल हॅलहेडकडून हिंदू विधीचे भाषांतर करून घेतले. 
  • त्याचा मित्र सर चार्ल्स विल्किन्स हा संस्कृत व फार्सी भाषांचा जाणकार होता. विल्किन्सने भगवद्गीते चा इंग्रजी अनुवाद केला. थोर प्राच्यविद्यातज्ज्ञ सर विल्यम जोन्स याने मनुस्मृती चे भाषांतर केले (१७८३). 
  • जोन्स, विल्किन्स व हॅलहेड यांच्या सहकार्याने हेस्टिंग्जने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याने संस्कृत पंडितांकरवी संस्कृत साहित्य, उपनिषदे, भगवद्गीता यांतील ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले.

वॉरन हेस्टिंग्सच्या कार्यकाळातील प्रमुख घटना


  • रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट, १७७३.
  • Supreme Council Of Bengal.
  • बंगाल एशियाटिक सोसायटी.
  • शाह आलम दुसरा या मुघल सम्राटाचे पेन्शन बंद केले.
  • Stopped Diarchy in Bengal.
  • जॉनथन डंकन द्वारा नवीन संस्कृत शाळा.
  • टांकसाळ मुर्शिदाबाद वरून कोलकाताला हलवली.
  • बंगाल गॅझेट - पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध.
  • पहिले आंग्ल - मराठा युद्ध (१७७५–८२).
  • दूसरे आंग्ल - म्हैसूर युद्ध (१७८०–८४ ).
  • पहिले रोहिला युद्ध १७७३–१७७४.
  • दुसरा रोहिला - उठाव १७७९.
  • Experimentation on land settlements. (१७७२-five years settlement, changed to १ year in १७७६).
  • भगवतगीता चे इंग्रजीत भाषांतर.

अधिक माहितीसाठी -