Wednesday 1 November 2017

कलिंगचे युद्ध..:-

कलिंगचे युद्ध..--

✍ ..कलिंगचे युद्ध..:-



👉 दिनांक :-
साधारणपणे इ.स.पू. २६५-२६१..

👉 स्थान :-
प्राचीन कलिंग, सद्य भुवनेश्वर (ओडिशा राज्य, भारत)..

👉 परिणती :-
मौर्यांचा विजय आणि कलिंगांचा पराभव..

👉 प्रादेशिक बदल :-
कलिंगचा मगधच्या साम्राज्यात समावेश..

👉 युद्धमान पक्ष :-
मौर्य साम्राज्य (सम्राट अशोक)
कलिंग (कलिंगराज)


-- कलिंगचे युद्ध सम्राट अशोकांनी इ.स.पू. २६१ मध्ये केलेले एक प्रमुख युद्ध होते..

-- कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे..

-- सुरूवातीला अशोक हे युद्धखोर झाले होते..
सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती..

-- अखंड भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते..

-- प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात..


👉 युद्धाची कारणे :-

-- कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत..
सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात..

-- त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते..

-- मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते..
तसेच बाह्य जगाशी व्यावसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, जी कलिंगाकडे होती..

-- तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हे खनिज समृद्ध देश होता..
त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे..

-- कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती..

-- युद्ध साधारणपणे इस पूर्व २६१ सुमारास सुरु झाले..
सुशीम चा एक भावाने कलिंगामध्ये मदत घेतली होती..

-- अशोक ने हे कारण मानले व कलिंगला शरण येण्यास सांगितले..


👉 कलिंग युद्धाचे परिणाम :-

-- या युद्दाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते..
मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले..

-- कलिंगच्या युद्धाचे अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले..

-- युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दु:खी झाला..

-- केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला..
पश्चात्तापदग्ध अशोकाने परत कधीही युद्ध न करण्याचा निश्चय केला..

-- या युद्धानंतर कोणत्याही प्रकारचे दु:ख त्याला सहन होईनासे झाले..

-- मनुष्य आणि इतर प्राणी किंवा वनस्पतींचीही केलेली हिंसा त्याला आवडत नसे..

-- अहिंसेच्या सिद्धांताने तो विलक्षण प्रभावित झाला..
या युद्धानंतर लवकरच अशोकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि देशविदेशात त्याचा प्रसार करण्यासाठी आपली सर्व शक्ती आणि साम्राज्याची साधनसंपत्ती पणाला लावली..

-- या लढाईनंतर अशोकाने दिग्विजयाच्या धोरणाचा त्याग करुन धर्मविजयाच्या धोरणाचा अवलंब केला..

-- त्याच्या परराष्ट्रीय धोरणातही अमूलाग्र बदल झाला..

-- सैन्यबळावर विसंबून राहण्याऐवजी त्याने शांतता, मैत्री या सिद्धांतावर अधिक भर दिला; म्हणूनच कलिंगचे युद्ध ही मानवी संस्कृतीमधील एक महत्त्वाची घटना मानली जाते..